मी क(ग) मविलेल्या गोष्टी....!
.
..
सहज मोबाईल च्या फ़ोटोज gallery मध्ये नजर गेली.... जुन्या कविता दिसल्या....
पुन्हा वाचायचा प्रयत्न केला....
"शब्दं तेच होते पण त्यांचे अर्थ मात्र बदलले होते.."
.
#आपला लिखाण आपल्यापुरत मर्यादीत नसतं...ते जस उतरत लगेच जगाशी जोडल जातं अन तेही आपसुकच.
'वाटायचं,,, कोणाशी तरी बोलावसं वाटण म्हणजे लिहिण'
तसच आहे ते. आयुष्यात अनेक प्रसंग येतात... मनात रुतून बसतात.. काही खुप कमी काळासाठी असतात तर काही अगदी आयुष्य जोवर आहे तोवर सोबत राहतात.
प्रत्येक मध्ये काही न काही गुण आहेच फक्त बाहेर यायला वेळ लागतो पण तो बाहेर येण्यासाठी एखादी घटना कारणीभूत असते... सुखद अथवा दुख:द.
.
जबाबदारी,आवड,विचार,मन, हे आणि असे अनेक शब्द वेगवेगळे असले तरी सरतेशेवटी कोणत्या न कोणत्या गोष्टी मध्ये अडकून रहताताच.
स्वत:ची स्वप्न, आयुष्याचा जोडीदार, घरची जबाबदारी, समजाच देण, अन अखेर देवाचे आभार... बस्स. ह्या पलीकडे देखील खुप काही आहे पण आपण तिथवर पोहचलो नाही अजुन.
हसतखेळत आयुष्य जगावं.... दुखा:ला ही अगदी तसच सामोर जावं.
प्रसंग येतात.. अन निघुन जातात.. आठ्वणी ठेऊन.
त्या जपता आल्या पाहिजे... हेच खरं गुपीत आहे. 

- समिर 
